13 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 मार्च 2022)
भगवंत मान यांचा VIP कल्चर संपवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय :
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी म्हणजेच आप या पक्षाला बहुमत मिळालं असून त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आपचे विजयी उमेदवार भगवंत मान हे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.
मात्र मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेण्याआधीच भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन सत्ता स्थापनाचा देवा केल्यानंतर एक मोठा निर्णय घेतलाय.
सरकार बनवण्याच्या आधीच पंजाबमधील सर्व 122 माजी मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षा काढून घेण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिलेत.
पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन होण्याआधी घेण्यात आलेला हा निर्णयमध्ये पंजाबच्या राजकारणामधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दृष्टीने मास्टर स्ट्रोक मानला जातोय.
यासंदर्भातील एक पत्रत विशेष डीजीपी राज्य सशस्त्र पोलीस जेआरसी, कमांडंट जनरल पंजाब होम गार्ड्स तसेच नागरिक सुरक्षा निर्देशक, एडीजीपी/एसपीयू/एसओजी तसेच सीडीओ बाटलियन्सच्या सर्व स्तरावरील आयजीपी आणि डीआयजींसहीत पोलीस अधिक्षकांना आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलीय.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) गुवहाटी येथे झालेल्या बैठकीत व्याजदराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
तर 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफ खातेधारकांसाठी 8.1 टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली आहे, जी चार दशकांतील सर्वात कमी असल्याचे म्हटले जाते.
बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेला हा व्याजदरात कपातीचा निर्णय आता अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
अर्थमंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आता नागरिकांना स्वतः करता येणार नोंदणी :
देशातील नागरिक, त्यांची इच्छा असल्यास, आगामी जनगणनेमध्ये ऑनलाइन स्व-गणना करू शकतील.
कारण सरकारने जनगणनेच्या वेळापत्रकात सुधारणा केल्या आहेत.
तर यामुळे नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नोंदणीसुद्धा सुरू राहणार आहे.
ऑनलाइन स्व-गणनेच्या तरतुदीला परवानगी देण्याव्यतिरिक्त, जनगणनेची माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी जाण्याचं काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
जनगणनेचा गृहनिर्माण सूचीचा टप्पा आणि NPR अपडेट करण्याची प्रक्रिया 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत देशभरात होणार होता, परंतु करोनाच्या उद्रेकामुळे ती पुढे ढकलली गेली.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताची वेस्ट इंडिजवर मात :
महाराष्ट्राची डावखुरी फलंदाज स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर या अनुभवी जोडीने झळकावलेल्या शतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजला 155 धावांनी नेस्तनाबूत केले.
भारताने दिलेल्या 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव 40.3 षटकांत 162 धावांत संपुष्टात आला.
तर या विजयासह भारताने अग्रस्थानी झेप घेतली.
मिताली राजच्या नावावर नवा विक्रम :
भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने एक अनोखा विक्रम केलाय.
तर ती महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठऱली आहे.
तसेच याआधी मिताली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू ठरली होती.
तर हा विक्रम अगोदर ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. तिने आतापर्यंत कर्णधार म्हणून 23 सामने खेळले आहेत.
तर मितालीचा कर्णधार म्हणून आजचा 24 वा सामना आहे.
याआधी तिने महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अशा सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू म्हणून मान मिळवला होता.
तसेच हा विक्रम प्रस्थपित केल्यामुळे ती थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जाऊन बसली होती.
300 पेक्षा अधिक धावा करणारा जगातील सहावा संघ ठरला :
सलामीवीर स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शानदार शतकी खेळीने भारताला महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत नेले.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 बाद 317 धावा केल्या.
तर यास्तिका भाटियाने आक्रमक सुरुवात केल्यानंतर स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी शतकी खेळी करत चौथ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली.
एकदिवसीय विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रथमच 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
महिला विश्वचषकात 300 पेक्षा अधिक धावा करणारा भारत जगातील सहावा संघ ठरला आहे.
भारतापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी महिला विश्वचषकात 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
दिनविशेष :
13 मार्च 1781 मध्ये विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना 13 मार्च 1897 मध्ये झाली.
पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 13 मार्च 1910 मध्ये अटक झाली.
13 मार्च 1930 मध्ये क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची 13 मार्च 1940 मध्ये उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.