15 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 मार्च 2022)
एन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :
टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवार यासाठी मंजुरी देण्यात आली.
टाटा सन्सने नुकतेच एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते, त्यानंतर यासाठी अध्यक्षाचा शोध सुरू होता.
मात्र, आता या सर्वोच्च पदावरील नियुक्तीला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत, जी 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांची होल्डिंग कंपनी आणि प्रवर्तक आहे.
12-14 वयोगटाचे लसीकरण उद्यापासून :
देशातील 12 ते 14 वयोगटातील मुलांचे करोना लसीकरण बुधवार, 16 मार्चपासून सुरू करण्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केली.
हैदराबाद येथील बायॉलॉजिकल इ. लिमिटेड या कंपनीने तयार केलेल्या कोर्बेव्हॅक्स या करोना लशीद्वारे 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
त्याचबरोबर 60 वर्षांवरील नागरिकही आता वर्धक मात्रा घेऊ शकतील, असेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’लागू होण्याचा मार्ग मोकळा :
महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा महाराष्ट्रात लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
कारण, राष्ट्रपती रामनाथकोविद यांनी या बहुप्रतीक्षित शक्ती विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही माहिती दिली.
महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवले होते.
‘शक्ती’ कायदा डिसेंबंर विधानसभेत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केला होता.
तर आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्यावरून हा कायदा करण्यात आला आहे.
त्यानुसार शक्ति फौजदारी कायदा( महाराष्ट्र सुधारणा) विधेयक गेल्या वर्षी अर्थसंल्पीय अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात आले होते.
तसेच या कायद्यात समाजमाध्यमांवर महिलांची बदनामी, अॅसीड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत.
भारताचा श्रीलंकेवर 238 धावांनी दणदणीत विजय :
भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी दणदणीत पराभव केला आहे.
याचबरोबर दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे.
भारताने T20 नंतर कसोटी मालिकेतही क्लीन स्वीप दिला आहे.
श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
तर पहिल्या डावात 109 धावांवर बाद झालेल्या श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात केवळ 208 धावाच करू शकला.
दिनविशेष:
15 मार्च : जागतिक ग्राहक हक्क दिन
15 मार्च 1493 मध्ये भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
मुघल सम्राट अकबर याने 15 मार्च 1564 मध्ये हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
15 मार्च 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
मेन हे अमेरिकेचे 15 मार्च 1820 मध्ये 23वे राज्य बनले.
15 मार्च 1827 मध्ये टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.