Current Affairs of 12 October 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 ऑक्टोंबर 2015)
इमोज आणण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील :
- फेसबुकवरील एखाद्या पोस्टवर “लाइक” आणि “कमेंट” करण्यापलीकडे जाऊन भावना व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारच्या इमेज आणण्यासाठी फेसबुक प्रयत्नशील आहे.
- फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यापैकीच काही इमेजींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
- व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे सर्व इमोजी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक पोस्टखाली लाइकसह संबंधित पोस्टवरील भावना व्यक्त करण्यासाठी एकूण सात बटने उपलब्ध होतील.
- त्यामध्ये प्रेम, हास्य, यश, आश्चर्य, दु:ख आणि राग या पर्यायांचा समावेश असेल.
- तंत्रविषयक वृत्त देणाऱ्या एका इंग्रजी दैनिकाने स्पेन आणि आयर्लंडमध्ये अशा प्रकारच्या इमोजी दिसण्यास सुरवात झाल्याचे म्हटले आहे.
- इतर देशांसह भारतामध्ये ही सुविधा केव्हा उपलब्ध होईल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Must Read (नक्की वाचा):
सामाजिक कार्यकर्त्या सारा जोसेफ यांनी साहित्य अकादमी पुरस्कार केला परत :
- देशात जातीय दंगलींमध्ये झालेल्या वाढीबद्दल दुःख व्यक्त करत मल्याळम लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सारा जोसेफ यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे.
- देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार परत करणाऱ्या सारा जोसेफ या केरळमधील पहिल्या लेखिका आहेत.
- देशात दिवसेंदिवस जातीय दंगलींमध्ये वाढ होत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी दर्शविली आहे.
- सारा जोसेफ यांच्यापूर्वी हिंदी कवी अशोक वाजपेयी आणि लेखिका नयनतारा सेहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे.
- यापूर्वी कन्नड लेखक शशी देशपांडे यांनी साहित्य अकादमी समितीच्या पदांचा राजीनामा दिला होता.
- तसेच कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबद्दल निषेध नोंदवत त्यांनी राजीनामा दिला होता.
खड्गप्रसाद शर्मा ओली यांची नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून निवड :
- पंतप्रधान निवडीसाठी नेपाळच्या संसदेत झालेल्या मतदानानंतर खड्गप्रसाद शर्मा ओली यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली.
- माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचा त्यांनी पराभव केला.
- कोईराला यांनी राजीनामा देण्याचे निश्चित केल्यानंतर एकमताने नवा नेता निवडण्यात संसदेला अपयश आल्याने मतदान झाले होते.
- ओली लवकरच देशाचे 38 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील.
- कोईराला हे स्वत: 2014 मध्ये ओली यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे “370”वे कलम कायमस्वरूपाचे :
- जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील “370”वे कलम कायमस्वरूपाचे असून त्यामध्ये सुधारणा करणे अथवा ते रद्द करणे शक्य नसल्याचे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
- तसेच राज्यघटनेतील कलम 35 (अ) हे विद्यमान कायद्याला संरक्षण देते, असे न्या. हसनैन मसुदी आणि न्या. जनकराज कोटवाल यांनी दिलेल्या 60 पानी निकालपत्रात म्हटले आहे.
- या कलमामुळेच राज्याला मर्यादित स्वातंत्र्य आणि विशेष दर्जा मिळाला असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
सहकार्य करण्याचा निर्णय भारत आणि मालदीव यांनी संयुक्तपणे घेतला :
- संरक्षण, सुरक्षा, ऊर्जा आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचा निर्णय भारत आणि मालदीव यांनी संयुक्तपणे घेतला आहे.
- सुमारे 15 वर्षांच्या खंडानंतर दोन देशांमध्ये संयुक्त आयोग पुन्हा स्थापन झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मालदीवच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
- तसेच या बैठकीनंतर दोन्ही देशांमध्ये क्रीडा आणि युवक कल्याणासंबंधी सहकार्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
सानिया व मार्टिना यांनी सलग आठवा चषक जिंकला :
- भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी आपले विजयी अभियान कायम राखले आहे.
- डब्ल्यूटीए चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून सलग आठवा चषक जिंकला.
- अग्रमानांकित सानिया-मार्टिना जोडीने सहाव्या मानांकित तैपेईच्या हाओ चिंग चान व युंग जान चान यांना 6-7 (9-11), 6-1 आणि 10-8 असे नमवून विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला.
- तसेच टायब्रेकरमध्ये 7-7 अशी बरोबरी असताना या जोडीने सलग चार गुण मिळविले.
- सानियाचे 2015 मधील हे नवववे तर हिंगीसचे आठवे विजेतेपद आहे.
मुलींच्या सर्वाधिक हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर :
- नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, 6 वर्षांखालील मुलींच्या सर्वाधिक हत्या 62 महाराष्ट्रात झाल्या आहेत.
- या चिमुरडींच्या हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
- त्याखालोखाल तामिळनाडू (34), उत्तर प्रदेश (27), मध्य प्रदेश (26) यांचा क्रमांक आहे.
- अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि आरोपींना जरब बसवून जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी देशामध्ये ‘पॉस्को’ कायदा करण्यात आला.
डॉ. मलगट्टी यांचा साहित्य अकादमी कार्यकारी मंडळाचा राजीनामा :
- साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असून गुजरातमधील विख्यात आदिवासी कार्यकर्ते गणेश देवी यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला.
- बंगळुरू येथील वृत्तानुसार कन्नड लेखक व संशोधक डॉ. अरविंद मलगट्टी यांनी साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले आहे.
- कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीने मौन पाळल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. राजीनामा पत्र सचिव व अध्यक्षांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
- पंजाबचे गुरुबचन भुल्लर, अजमेर सिंह औलाख व आत्मजित सिंह यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले.
ऑस्ट्रेलियाची गौतम बुद्धाची शिल्पकृती भारताला परत दिली जाणार :
- जर्मनीने अलीकडेच दुर्गामातेची मूर्ती भारताला परत दिल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या कलासज्जेत असलेली गौतम बुद्धाची शिल्पकृती भारताला परत दिली जाणार आहे.
- बुद्धाची ही बसलेल्या अवस्थेतील मूर्ती उत्तर प्रदेशातील मथुरेची असण्याची शक्यता आहे.
- सध्या ती ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे राष्ट्रीय कला सज्जेत आहे असे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
- गेल्या आठवडय़ाच ही मूर्ती परत करण्याबाबतची सूचना ऑस्ट्रेलियाच्या कला सज्जेने भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाला पाठवली आहे.
- हे शिल्प वालुकाश्माचे बनवलेले असून तशी शिल्पे मथुरेतच आढळतात.