Current Affairs of 23 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 मार्च 2016)

भाई वैद्य यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ :

  • पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे.
  • तसेच हा पुरस्कार त्यांना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत असल्याची माहिती ‘पुण्यभूषण फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली.
  • एक लाख रुपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फळाने नांगरत असलेली प्रतिमा, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भाई वैद्य यांची निवड केली आहे.
  • मे महिन्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल, पुरस्काराचे यंदाचे 28 वे वर्ष आहे.
  • पुरस्काराबरोबर सहा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे.
  • सोशालिस्ट पार्टी (इंडिया) या पक्षासह भारत यात्रा ट्रस्ट दिल्ली, एस. एम. जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे मनपा सेवा निवृत्त संघ अशा संस्थांचे वैद्य हे अध्यक्ष आहेत.
  • वैद्य यांनी 1942 मध्ये शालेय जीवनात असताना चलेजाव चळवळीमध्ये भाग घेतला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मार्च 2016)

श्रीहरी अणे यांचा महाधिवक्‍तापदाचा राजीनामा :

  • मराठवाड्याच्या वेगळ्या राज्याला आपला पाठिंबा असेल, असे वादग्रस्त विधान केल्याने सरकारला अडचणीत आणणारे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी (दि.22) महाधिवक्‍तापदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दिला.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात अणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडी तयार झाली असतानच अणे पदावरून पायउतार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले.
  • सत्ताधारी आघाडीतील शिवसेना तसेच विरोधी बाकांवरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रसने एकत्रित आघाडी उभारली होती.
  • तसेच या पक्षांनी अणेंविरोधात प्रस्ताव देत मतदान केले असते, तर तो सरकारविरोधतला अविश्‍वास प्रस्ताव ठरला असता.
  • अप्रत्यक्षपणे सरकार अल्पमतात आल्याचे गृहीत धरून अर्थसंकल्पीय कामकाज पूर्ण होणे ही कठीण झाले असते.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 :

  • प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम 2011 च्या जागी केंद्र सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अधिसूचित केला आहे.
  • प्लास्टिकच्या महाप्रचंड व अतिरिक्त वापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्लास्टिक कचराबंदीबाबतची ही नवी अधिसूचना जारी केली.
  • देशभरातील प्लास्टिक कचऱ्याला आळा घालण्याची जबाबदारी या प्लास्टिकचे उद्योजक व ग्रामपंचायतींपासून सर्वांवर लागू होईल.
  • तसेच यासाठी राबविल्या जाणाऱ्या व्यापक जनजागृती मोहिमेचे घोषवाक्य ‘प्लास्टिक नही कपडा सही’ हे असेल.
  • यानुसार प्लास्टिक पिशव्यांच्या किमान जाडीची 40 मायक्रॉन्सची मर्यादा वाढवून 50 मायक्रॉन्स करण्यात आली आहे.
  • तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम देशातील सहा लाख ग्रामपंचायतींनाही लागू होणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला या नियमांमुळे हातभार लागणार असून त्यामुळे स्वच्छतेच्या आघाडीवर लक्षणीय सुधारणा होईल.
  • केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल राज्यमंत्री प्रकाश जावडेकर हे आहेत.

ट्विटरला 10 वर्ष पूर्ण :

  • ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉरसे यांनी 21 मार्च 2006 रोजी पहिले ट्विट केले, त्यापाठोपाठ त्यांच्या टीमने ट्विटरवर जॅकला फॉलो केले.
  • तसेच आता 10 वर्षांनंतर ट्विटरने 32 कोटी वापरकर्त्यांपर्यंत मजल मारली आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेबाहेर 25 कोटी 40 लाख लोक ट्विटर वापरत आहेत,त्यातील भारतात केवळ 17 टक्‍के आहेत.
  • जगभरात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी आणि संशोधकांपर्यंत ट्विटर वापरकर्ते आहेत.
  • अगदी राजकीय कल मांडण्यापासून ते एखाद्या माहितीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ट्विटर हे हमखास माध्यम म्हणून पुढे आले आहे.
  • पण, ट्विटरला सोशल मीडियावरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे.
  • तसेच दोन्ही माध्यमांपाठोपाठ ट्विटर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विवेक प्रभू केळुस्करांच्या व्यंगचित्राला प्रथम पारितोषिक :

  • महाराष्ट्र सरकारच्या जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाइन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभू केळुस्कर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले आहे.
  • तसेच कपिल घोलप यांच्या व्यंगचित्राला दुसरेअनीश वाकडे यांच्या व्यंगचित्राला तिसरे पारितोषिक मिळाले आहे.
  • महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, जलप्रदूषण असे विषय देण्यात आले होते.
  • राज्यभरातून अक्षरश: शेकडो व्यंगचित्रकारांनी उत्कृष्ट व्यंगचित्रे पाठवली.

सूरत हे भारतातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक :

  • रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार भारतातील 16 झोनमधील एकूण 407 रेल्वे स्थानकांमध्ये सूरत हे भारतातील सर्वांत स्वच्छ स्थानक असून महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाला चौथा क्रमांक मिळाला आहे.
  • भारतीय रेल्वे आणि टीएनएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी देशभरातील 16 झोनमधील ‘ए-1’ आणि ‘ए’ श्रेणीतील एकूण 407 रेल्वे स्थानकांची पाहणी केली.
  • तसेच त्यापैकी 13 स्थानकांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशिष्ट श्रेणीत स्थान मिळविले तर 92 स्थानकांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून प्रथम श्रेणीत स्थान पटकावले.
  • या सर्व स्थानकांचा अभ्यास करताना प्राथमिक सोयीसुविधांसह वेगवेगळ्या 47 घटकांचा अभ्यास करण्यात आला.
  • तसेच प्रवाशांकडूनही  माहिती गोळा घेण्यात आली.
  • या सर्व स्थानकांमध्ये सूरत हे सर्वात स्वच्छ स्थानक असल्याचे आढळून आले आहे.
  • तर राजकोट आणि विलासपूर अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्वच्छ स्थानक ठरले आहे.
  • त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर स्थानकाचा क्रमांक लागला आहे.
  • यामध्ये महाराष्ट्रातील 4 स्थानकांना पहिल्या 75 मध्ये स्थान मिळाले.

जिल्हा विभाजन समितीला मे 2016 पर्यंत मुदतवाढ :

  • राज्यातील जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला मे, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्याचे सरकारने ठरवले आहे.
  • तसेच त्यामुळे या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नाशिक जिल्हा विभाजन आणि मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लेखी उत्तरात दिले.
  • राज्यातील नवीन जिल्ह्यांची व तालुक्यांची निर्मिती करण्याबाबतचा तारांकित प्रश्न अपूर्व हिरे यांनी विचारला होता.
  • प्रशासकीय सोयीसाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मालेगावसह नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे, असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता.
  • त्यावर जिल्हा विभाजनाबाबतचे निकष ठरवण्यासाठी अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला डिसेंबर 2015 पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.
  • मात्र, समितीला मे 2016 पर्यंत मुदतवाढ देण्याचा सरकारचा विचार आहे.
  • समितीचा अहवाल मिळाल्यानंतर निश्चित केलेल्या निकषानुसार नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्हानिर्मितीचा निर्णय घेण्यात येईल.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मार्च 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

3 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

3 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

3 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

3 years ago